Friday 17 February 2023

महाशिवरात्री - जीवनाचे गुप्त रहस्य कि मात्र एक श्रद्धा


 

१८   फेब 23 आज, 
महादेवा आज रात्रीच तू तांडव केले होते . तुला ना आदी ना अंत मग हा प्रकट दिन तरी कसा म्हणायचा.
हजारो लोकांची गर्दी आहे तुझ्या दर्शनाला, भलीमोठी रांग प्रत्येक तुझ्या मंदिरात आज.

मी कुठेच नाही ह्या गर्दीत, काय हि परिस्थिती माझीतू  खरेच आहेस  कि   नाहीस  याची  मला  परिपूर्ण  कल्पना  नाही. गर्दीत   फिरतोय  मी गर्दीचा  भाग  असून  नसल्यासारखा ;एकांतात रहातोय  मी ,पण सगळ्या  जगभरच्या   जिवंत  घडामोडी  पाहत.

असा कसा हा विरोधाभास  माझ्या  जीवनात -जीवन  हेच  मुळी  विरोधाभासिक आहे.

आणि  जग हे तुझ्या अधीन असूनही  तू एक वैरागी म्हणून ओळखला जातोस किती विरोधाभास आहे हा.

आणि  मी  ज्याने  कधीही कुठली  तिथी  किंवा  वार  पाळलेला नाहीकि  कुठला उपवास  कुठला उत्सव मी असा वेगळा साजरा करीत नाही तरी  का  मी तुला  अगदी गृहीत धरतो कि मी अगदी तुझ्या जवळ आहेस.

माझी  हि  मूर्ख  कल्पना  असेल.

पण  का  असे   वाटते  कि  ह्या  गोष्टी खरेच  महत्वाच्या  नाहीत  तुला  जाणून घ्यायला लोक  बघतात,  त्यांना  काय  हवे ; पण  कोणी हे पाहत  नाही  तुला  काय  हवे

अगदी  सोपे  गणित  आहे ; परस्पर   अवलंबी   हे  जीवन  आहे, पर्यावरण  प्रकृती पुरुष सूक्ष्म जीव हे सर्वे  परस्पर  अवलंबी  आहेत. मग  का  हे  जग  ज्या  गोष्टी  मुळात  गरजेच्या  नाहीत, त्या  गोष्टी  मागे  व्यर्थ  ताकत वाया घालवते.

वाटते  ५०००  वर्षांपूर्वी   कुठेतरी  चूक  झाली  असावी , बॅबीलॉन च्या अगदी आधी जेव्हा मनुष्य हा शेती आणि घर करून राहायला लागलाधातूचा  आणि  चाकाचा  शोध  लागला आणि  परस्पर  अवलंबी  ह्या नियमाचा विसर पडत गेला.

मनुष्याच्या   संगतीत  राहणाऱ्या  पशु पक्षी आणि वनस्पतीचे  देखील  फायदे  झाले.

वाघ  सिंहाचे  काय? गेंडे  पाणघोडे यांचे काय? अशा किती प्रजाती लुप्त झाल्या ज्या गरजेच्या होत्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी.

जिथे  वाघाचा  जन्म  मिळायचा  तिथे  मांजराचा  मिळतोय ,जिथे  पिंपळाचे  झाड  व्हायचे तिथे  काटेरी बाभळीचा. जिथे घोडा बनायचे होते तिथे  म्हैस बनतोय, शेवटी  आपणच तर   फिरतो  ह्या  शरीरातून  त्या  शरीरात मग  एकाच  शरीरात  अनेक  जन्म अनेक  विकार,  शारीरिक आणि मानसिकही. परिस्थीशी   लढण्याचा कमी  अनुभव  आणि मानसिक  दृष्ट्या  नैराश्य.

८०लोक  हे  दुस्यासाठी  जगतातनको  असून जगतात  कारण  मरणाला  घाबरतात.

मृत्यू तर  अंतिम  सत्य  आहे.

मग  का  हा  दुखावा  रुसवा  फुगवा ? कुठल्याही  प्राण्याला  तो  कसा  जन्माला  आला  आणि  कसा  मरण पावला समजत  नाही. मनुष्य  मात्र  प्रत्येक वेळी मरण पाहत असतोत्रासही  मरणापेक्षा  जास्त  सहन  करतो. काही  मुक्ती  साठी  याचना  करतात बऱ्याच  जणांना  तर  हे  पण  ठाऊक नसते  कि  मुक्ती ची याचना  करावी. ते  फक्त  आजची  वेळ टाळून  आनंद  परत  यावा  एवढेच  इच्छिता.

लोकांची  श्रद्धा  म्हणजे  तू  आहेस आणि  गरज  हि  आहे  ह्या  समाजाला  तुझ्या  अस्तित्वाची,  नाहीतर  स्वतःच्या मर्जीने  वागून  हाहाकार  मजला  असता ; पण  मनुष्याचा  व्यतिरिक्त  कुठल्या  दुसऱ्या  प्राण्याने  तुझी  भक्ती उपासना  किंवा  पूजा  केली  मला  दिसत  नाही .कदाचित ह्या गोष्टींचा तुला फरक पडत नसेल, मनुष्य स्वतःचा विश्वास अबाधित राहावा केलेल्या पापाचा पच्छाताप म्हणून करत असेल हे.

श्रद्धेच्या  पलीकडेही  तू  कुठेतरी  आहेस.

मी  तुला  शोधतोय ;

सागरच्या  पाण्यातील  मिठासारखा  आहेस,  खारटपणात जाणवतोस  खरा  पण  दिसत  नाहीसकदाचित  कधी  दिसणारही  नाहीस.

त्यामुळे  कदाचित  तुला  तू  सगळ्यामध्ये  असूनही  निराकार  आहेस  असे  म्हटले  जातेह्या  प्रकृती  सोबतच  तुझा  जन्म  झाला;  प्रक्रितेने  तुला  बनवले  आणि  तू  प्रकृतीला  बनवले.

दोघेही  अवलंबून आहेत;  एकाच  वेळी    उदयाला  आलेले.

 तू  कधी  प्रकृतीला  नमवतो  तर  ती  कधी  तुला, तू  अबोल  आहेस , तुझी  बोली  समजणे  अवघड  आहे , चुका  होणे  हा  सर्व  जीवाचा  स्वभाव आहे.प्रत्येक  जीव  त्याच्या  पद्धतीने   स्तरावर  चुका  करतो आणि सुधारतो. मनुष्याची  अंध श्रद्धा  त्याला  बळ देते  खरे,  तर  तू कुठलाही   चमत्कार  करत  नाहीस .

तू  तुझे  काम  करतोस -

सर्व  जीवांमध्ये  धागा  गुंतल्यासारखा ,धाग्याशिवाय   मोती  एकत्र  नाही  राहू  शकत;आणि  मोत्याशिवाय  धागा  आकार  नाही  घेऊ  शकत, ज्या  मोतीने  स्वतःमधला  धागा  ओळखला  तो  बुद्ध  झालाअंध भक्तांनी  तुला  जाणलेच  नाही  कधी.

कवींनी  तर  कधी  शायर लोकांनी तुला  बऱ्याचता जाणले,  लिहलेही. पण  ते  हि  अस्पष्ट  आणि  कोड्यात , कारण  असाच  तर  तू  आहेस

हा  संभ्रम  कधी   दूरही  होणार  नाही , असाच  तर  तू  दुहेरी आहेस .

वाळू  प्रमाणे  आहेस , मूठ  आवळली   तरीही  निसटतो आणि  मूठ  नाही  आवळली   तरीही. मुळात जे हातात ते तू नाहीस.  हातातून निसटणारी वाळू  जी ना जमिनीवर आहे ना हातात, हवेच्या संपर्कात विखुरलेली ,तो गुणधर्म म्हणजेच तू आहेस.

नदीतल्या   पाण्यात  तू दिसत  नाहीस  आणि  ओंजळीतल्या पाण्यात  पण

पण  अर्घ्य  अर्पण  करताना  जी  धार  असते  आणि  त्यात  सूर्य  चमकतो  म्हणजे  तू, तिथे तू प्रकट होतोस तेच तुझे अस्तित्व .

म्हणून  तर  तू  सर्वत्र  आहेस  आणि  नाहीस  पण, अशी  वाख्या  केली  जाते.

गजानन मुंडकर 

Wednesday 16 June 2021

संध्याकाळ (लॉकडाऊन नंतरची 2021) - 3 (#SarangaDariya)

 



१५ जुनाची संध्याकाळ, आज इव्हनिंग वॉक घेणे शक्य नव्हते. बराच रात्री उशिरापर्यंत काम करत बसलो होतो. रात्री अकरा नंतर काम  करायचे म्हणजे काहीतरी म्युजिक आणि स्नॅक्स एकदम मूड बनवणारे. नेहमीप्रमाणे अकाउस्टीक म्युजिक ऐकण्याचा आनंद घेत होतो. झोमॅटो वरून काहीतरी मागवण्याची इच्छा झाली. "कर्फ्यू  हॅज बिगन" असा मेसेज दिसला. घरात काही बनवायची इच्छा नव्हती. उगाच फ्रीझ उघडून पहिला, गाजर आणि काकडी बरीच होती, प्लेट मध्ये सलाड बनवून जागेवर पुन्हा लॅपटॉप समोर बसलो. 

बऱ्याच दिवसापासून आरिआना ग्रांडेचे गाणी ऐकली नव्हती. सॅम आणि कॅट ह्या मालिकेमध्ये एकदम गोंडस आणि निरागस दिसणारी ती आता बरीच हाय फाय झाली होती. तिचा क्युटनेस हा अजूनही ओव्हरलोड होता.युट्युब मिनीमाइज करून कामामध्ये गुंतलो. पूर्वी युट्युब मिनीमाइज केला कि गाणी पण बंद होत होती, बघायचे नसेल तर ऐकायचे पण नाही असे धोरण युट्युबने बदललेलं होतं. बऱ्याच गोष्टीही बदललेल्या होत्या. तुमच्या आवडी जपून नवा काय ते ट्रेंड चालू आहे, हे युट्युब एकामागून  एक दाखवत होते. ऑटोप्ले ऑन करून मी कामात गुंतून गेलो.  १० एक नेहमीची  गाणी झाली असतील ऐकून, कामात एव्हाना बराच गुंतलो होतो. एकदमच बासरीची धून कानावर पडली. फारच मधुर होती ती. गाणं हळू हळू जोर धरत होतं, साऊथ चा गाणं होतं ते. काही एक शब्द कळत नव्हता. पण गाणं असं काही थिरकत होतं कि, जणू कैक दिवसापासून कोरड्या पडलेल्या धबधब्यातून जोरदार पांढरंशुभ्र फेसाळ पाणी ओसंडून वाहत आहे. गाणं मध्यावर आले,तसे माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती. शेवटी ना राहवून मी गाणं ओपन केलंच. अगदी धुंद होऊन थिरकणारी ती नजरेस पडली. इतकी ऊर्जा त्या गाण्यामध्ये होती जणूं शब्दच आठवणे बंद  झाले होते. सध्या फॅशन च्या ट्रेंड मध्ये, हे एकदम, अगदी गावातल्या भारतीय वेशभूषा आणि राहणीमान ह्या चाकोरीत बनवलेले ,अस्सल देशी पद्धतीचे गाणे हृदयाला आरपार शिरून जाईल असे कधीच वाटले नव्हते. बाहुबली नंतर साऊथ ने पुन्हा एकदा स्वतःच्या कल्पकतेला सिद्ध केले होते. हे गाणे एक उच्च पातळीच्या शैलीचे स्वतःमध्येच एक उदाहरण होते.पुन्हा रिप्ले केला, एकदा दोनदा पहिला, पण तो भेभान नाच, तो मुक्तछंद भाव काही केल्या उमजत नव्हता. लॉकडाऊन  नंतर खरंच अशा सुरुवातीची गरज होती. लोंकांमध्ये एक नवीन उमंग भरेल असे ते गाणे होते. कुठल्याही एक प्रकारच्या बंधनाची पर्वा न करता ती  भेभान नाचत होती. हा खरे तर कळसच होता. तिच्या थिरकणाऱ्या पायांनी शकिरा आणि नोरालाही केव्हाच पछाडून लावले होते. अतिशय खुल्या मनाने मुक्तरंग ती उधळत होती. जसेकाही तिच्या हृदयाची सारेच दरवाजे तिने उघडलेले होते. तिची ती मुक्त आनंदाची उधळण दूर दूरवर जणू गर्दीत पसरत होती. तिचे ते भाव आणि स्टेप्स अगदी अगदी नॅच्युरल होते.रिदम आणि  बिट्स ची जणू  तिला पर्वा नव्हती. सैरा बानू पासून ते श्रद्धा कपूर पर्यंत, आजपर्यंत बॉलीवूड मध्ये अशा प्रकारचा डान्स आणि भाव मी तरी नाही पहिला. बाकी कोणाला उमगले असेल कि नाही पण तिने बेस्ट ऑफ दि बेस्ट परफॉर्मन्स दिला होता. अर्थार्थ कॉम्पोसर आणि कोरियो ग्राफर यांची सुद्धा काम हे कौतुकास्पद होते. #sarangdariya असा हॅशटॅग हि दिसला. पण ती कोण होती ते मात्र ठाऊक नव्हते. स्टेटस ठेवण्यापलीकडे मी काही आणखीन कौतुक करू शकत नव्हतो.  पुढच्या अर्ध्या एक तासात राहिलेले काम  आटोपले, आणि तसाच बेड वर पहुडलो. गाण्याचे ते काही शब्द ( आधी रमते राधुरा सेलिया.., दाणी पेरे सारंगा दारिया  ..) हे अजूनही कानात घुमत होते. आज शांत झोप लागणार हे निश्चित.

सकाळी जाग आली अगदी फ्रेश सकाळ होती. फोन चेक केला बरेच रिप्लाय होते. एका जर्मन मित्राचा  माईंड ब्लोविंग असा रिप्लाय आला होता, चेन्नईच्या एका मित्रानेहि रिप्लाय केला " गजानन, धिस इस कोलीवूड सॉंग & हर नेम इस  "साई पल्लवी" 

३-४ महिन्यापूर्वी रिलीस झालेल्या ह्या गाण्याचे 200M च्या वरती views क्रॉस झाले होते. आणि अजूनही ते सोशल मीडिया वर धिंगाणा घालत होते.

.. must watch 


https://www.youtube.com/watch?v=9XYEF-2gxfw

#SarangaDariyaFullVideoSong​ #Mangli #SaiPallavi​

watch here

गजानन मुंडकर (पुणे )



Sunday 13 June 2021

संध्याकाळ (लॉकडाऊन नंतरची 2021) - 2






१३ जून, रविवार बराच उशीर झाला होता. बसून बसून पाय जाम आखडले होते. अंदाजाने ९:३० वाजले असतील रात्रीचे. बाहेर पाऊसही नव्हता, वर्षभर तसेच पडलेले ड्रॉवर मधील हेडफोन काढले, ब्लूटूथ स्टार्ट केला, काही सेकंदातच कनेक्ट झाले, बॅटरी हि ६०% होती. फार आश्चर्य वाटले आणि टेक्नॉलॉजि विकसित होत आहे याचा आनंदही झाला.ऍमेझॉन म्युजिक स्टार्ट केले, पहिलेच गाणे डिसपॅसितो होते. कित्येक वेळा ऐकले असेल मी, गाण्यातला काही एक शब्द कळत नव्हता, पण गाणे असे काही एकदम मूड बनवणारे होते. ४ एक वर्षांपूर्वी, म्युजिक ब्लूटूथ ने ऐकायचे म्हणजे किमान १० एक मिनिट जायचे, फोन आणि हेडफोन कित्येक वेळा रिस्टार्ट करायचो.

विचाराच्या धुंदीत गेट बाहेर कधी आलो समजलेच नाही. ९० च्या दशकातील एक म्हण आठवली. माणसाला भरपूर काही हौस करायची इच्छा असते पण त्या वेळी त्याच्याकडे पैसा नसतो, आणि जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो तोपर्यंत वय हे भरपूर होऊन गेलेले असते. आज इन्स्टंट लोण आणि नो कॉस्ट ईएमआय सारख्या गोष्टीनी जीवन खरेच सुलभ केलेले आहे. जो पैसा तुम्हाला ५ एक वर्षानंतर मिळणार होता तो तुम्ही आता वापरू शकता थोडक्यात काय तर तुम्ही भविष्यच विकत घेताय. पूर्वी लोण प्रकरण एवढे सोपे नव्हते. डिस्काउंट आणि ऑफर हि  नव्हत्या. जेव्हापासून  ग्राहक हाच प्रॉडक्ट झालाय तेव्हापासून सगळ्यांचीच चांदी झालीय.

दिवार, शोले, अशा मुव्ही माधली खडतर जीवन आता तरी दिसत नाही. उपाशी राहून कोणी जीव सोडला, आखरी बची हुई रोटी साठी कोणी खून केला असा प्रकार आजच्या सिनेमा मध्ये दिसत नाही. बाकी पाहण्याचा दृष्टीकोन..

तंत्रज्ञाचा कुठलाच असा परिणाम मला जाणवत नाही कि ज्यामुळे जीवन खडतर झाले असेल. ऍनिमल प्लॅनेट वरील प्राण्यांचे जीवन बघता माणसाचे जीवन हे बरेच सुसह्य आहे. पण उगाच दुसऱ्याशी तुलना आणि पैशाच्या हवासापोटी माणूस हा जीवनातील रस पाहू शकत नाही. परवाच भेटलेली एक मैत्रीण, आजकाल वर्षाला एक करोड म्हणजे सुद्धा जास्त नाहीत म्हणणारी, तिला ह्या गोष्टी समजून सांगणे मला तरी शक्य नव्हते.

स्पर्धेमुळे प्रगती होते, स्पर्धा  हि नक्की असावी, पण ती जीवघेणी नसावी. एखादेवेळी मरताना जेवढा त्रास होणार नाही, एवढा त्रास हि स्पर्धा देऊन जाते.

कुठेतरी ह्या स्पर्धेला अंकुश लागणे महत्वाचा होते, आणि ते तसे झालेही. ह्यानंतरचे जग हे नक्कीच वेगळे असणार, अधिक स्तिरावलेले, अधिक शांत आणि अधिक कार्यक्षम..


तरीही एका विशिष्ट चौकटीत चालणाऱ्या ह्या जगाला जीवनाचा आनंद काय हेच समजावणे अवघड आहे. उगाच भविष्यात कुठेतरी चमत्कार होईल आणि स्वर्ग गवसेल, असा विचार करणारे हे जग, आपण प्रत्यक्षात एका स्वर्गातच जगतो हेच मुळी विसरून जाते. खरे पाहता किती अकल्पनीय आहे हे, ब्रम्हांडाच्या एवढ्या मोठ्या विस्तारात पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती होणे, हा काय कमी चमत्कार आहे, किती अनाकनीय, अकल्पित गोष्टी आहेत, टीव्ही , इंटरनेट, स्मार्ट फोन, हे काय कल्पना आणि चमत्कारापेक्षा थोडेच कमी आहे. 

आज बराच चाललो जवळपास ६ एक किलोमीटर चाललो असेन, पाय हि जाम थकून गेलेत, शरीरासोबत आज मनही हलके झाले, रात्रीचे अकरा वाजत आहेत, घरासमोरील खाटेवर चार पोरं PUBG खेळताना वगळता, रोडवरची कुत्रीही झोपली आहेत. असो...

स्वतःहून स्वतःलाच वेळेच्या बंधनात गुरफुटून टाकलेल्या सध्याच्या माणसाची अवस्था हि एका जंगलातील वाघाप्रमाणे झाली आहे ज्याने स्वतःलाच गुहेत कैद करून घेतले आहे. विशाल जंगल त्याच्यासमोर विखुरलेले आहे, पण गुहेची चौकट ओलांडायची त्याची हिम्मत नाहीये. 


 


गजानन मुंडकर (पुणे )

Thursday 10 June 2021

संध्याकाळ (लॉकडाऊन नंतरची 2021)

 





१०जूनची संध्याकाळ आज थोडा लवकरच मोकळा झालो. उद्या शुक्रवार सुट्टी असल्यामुळे आज थोडा रिलॅक्स हि होतो. बाहेर फेरफटका तरी मारून यावा अशी इच्छा झाली. बरेच महिने उलटले असतील कधी संध्याकाळचा वॉक घेऊन. ६ जून नंतर बरीच नियम हि शिथिल करण्यात आली होती. टीव्ही बंद केला फोन आणि चावी घेऊन तसाच बाहेर पडलो. सात एक वाजले असतील, सेक्युरिटीशी नजरा नजर झाली, सवयीप्रमाणे कुठे?? असा त्याने अविर्भाव आणला, नंतर ओशाळला. आणि रजिस्टर वर सही न करता तसाच मी बाहेर पडलो.  काहीतरी बदल्यासारखं वाट्लं. ३- ४ मुलांचा ग्रुप भरधाव वेगाने रस्त्यावरून पळताना दिसला. जणू जेल मधून नुकतीच काय ते सुटले असतील. स्वतःला अजमु पाहत होती, त्यांच्यातील हातवारे आणि खिदळतानाचा आवाज जणू काही ते स्वतंत्र भारतात परतले कि काय असे वाटत होते. मलाही काही वेळ लागला, थंडगार हवा थोडी बोचरी जाणवत होती.माझा श्वासाचा वेगही वाढत होता, जणू काही छाती शक्य तेवढी हवा आत घेऊ पाहत होती. त्या अंधारात माझे डोळे स्थिरावण्याचा प्रयत्न करीत होते, डोळ्यांची जळ जळ कमी होत होती. कोरड्या डोळ्यामध्ये जणू ओलसरपणा येत होता.रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली पिंपळाची झाडे जणू वाऱ्यासोबत सोबत वादन करत होते. 

क्षण एक वाटले काहीतरी बदलेले आहे, पण काय ते समजत नव्हते. जसा पुढच्या वळणावर आलो तसे नेहमी बंद असणारे घराचे दरवाजे आज सर्रास उघडे होते, त्यात हॉल मध्ये असणारे मोठाले टीव्ही रोडवरूनही स्पष्ट दिसत होते. समोरच एक घरगुती ब्युटी पार्लर होते , अंगणातल्या त्या झोपाळ्यावर दोन मैत्रिणी मस्त गप्पा मारत होत्या. पुढच्या वळणाला खांबावरची लाईट बंद पडली होती काही दिसतच नव्हते, फोनचा चा फ्लॅश चालू करायचा  विचार करत होतो तोच रोडवरची कुत्री ओरड्याला लागली, त्याबरोबर लगेच गेट च्या बाहेर तोंड काढून भुंकणारी २-४ कुत्री मला दिसली, जी कित्येक दिवसापासून गायब होती, आसपासच्या अपार्टमेंट मधूनही भुंकण्याचा आवाज आला. काहीतरी बदलत होते. पण नक्की काय समजत नव्हते.

एव्हाना श्वास पूर्णपणे मोकळा झाला होता. समोरचा २०० एक मीटर चा रोड हा प्रशस्त रोड जणू स्ट्रीट लाईट खाली लखलखाटत होता, धूळखात पडलेल्या  रस्त्याच्या शेजारच्या गाड्या काही दिसत नव्हत्या. तो आल्हादायक वारा आता जणू ओळखीचा वाटत होता. पुढल्या कॉर्नर ला येतो ना येतो तोच मंदिराची घंटा कानावर पडली. संध्याकाळची आरती चालू होती. कोणी एक आजी दिवा लावत होती तर तिची नात घंटानाद  करत होती. 

त्या छोट्याश्या जागेतील ते इवलेशे गोंडस मंदिर, असा अनुभव नक्कीच मागच्या जन्मीचा वाटत होता. पुढचा अर्धा एक किलोमीटरचा रास्ता हा सरळ होता, हार्डवेअर ची, पेंटची,  किराणा दुकाने, सारे काही बंद होते, इव्हनिंग वॉक साठी आलेली १-२ नजरेस पडले, रस्ताच्या दोन्ही बाजूंना झाडांच्या पानांची सळसळ अशी धून ऐकू येत होती, त्या आवाजात गुंतत होतो तोवर दर्र्र्रर्र  आवाज करत एक ऍक्टिवा भर्रकन निघून गेली, मागे वळून पहिले तर झोमॅटो चा लाल रंगाचा टीशर्ट घातलेला दिसला. त्याविचारात चालत पुढे निघून गेलो हे कळलेच नाही. समोरच शेजारी असणाऱ्या दोन दुकानाच्या आत छोटासा जाळ दिसला, ओळखीचा वाटत होता पण त्या अंधारात उमजत नव्हता.

 कित्येक दिवस बंद असलेली चहाची ती छोटी टपरी आज चालू होती. आपल्या मोपेड, स्टॅण्डवर लावून ३ एक जण कॉलेज ची पोरं चहा आणि सिगारेट ची झुरके घेत होती. लांबून आलेली वाटत होती कित्येक दिवसानंतर भेटत असावीत, त्यामुळेच मेन रोड वरून आत आली होती. 

पुढच्या वाळणानंतर , साधारण अर्धा एक किलोमीटर नंतर पुणे एअरपोर्ट रोड होता. त्या कोपऱ्याला आलिशान मेडिकल स्टोर होते, आता ते जनरल स्टोअर झाले होते. लॉकडाऊन च्या कित्येक रात्री इथे कार घेऊन मास्क घालून यायचो मी, कधी कधी पोलीस हि भेटायचे. असो..

पुढच्या वळणावर आलो तोच निवडुंगाचे एक भले मोठे दांडके चक्क रोड वर आले होते, अंदाजे ६ एक फूट लांब आणि 5 एक इंच रुंद एवढे मोठे होते ते, रस्त्यालगतच्या घराच्या बागेच्या जाळीतून चक्क रस्त्यावर आले होते, निवडुंग एवढा मोठा असतो हे पहिल्यांदाच समजले, बहुदा मॉर्निंग वॉक बंद होता म्हणून एवढे वाढले हे, नाहीतर रामदेव बाबाच्या भक्तांनी त्याला सकाळीच संपवला असता. 

२ एक मुली आणि त्यांचा जर्मन शेफर्ड वगळता रस्त्यावर कोणी एक दिसत नव्हते. वाऱ्याची झुळ झुळ , हवेतील गारवा जणू काही गुदगुल्या करत होता, सहज फोन वर नजर टाकली साडेसात वाजले होते, तिला सहजच " hi" पाठवला. ती ऑफिसच्या कामात गुंतलेली असणार.  " आय अँम स्टील वर्किंग"  तिचा रिप्लाय आला. 

ती डिप्लॉयमेंट मध्ये व्यस्त होती मागच्या २ दिवसापासून, म्हणून जास्त काही बोलायचे टाळले, उगाच चवताळलेल्या वाघाच्या घशात हात घालण्यात काही अर्थ नव्हता. तसाच मेडिकल जवळ पोचलो, दुकानाच्या बाहेरच त्याच्या फ्रीझर मध्ये डोकावून पहिले, भरमसाठ कुल्फी आणून ठेवल्या होत्या त्याने. बोला सर, कुठली देऊ गुलकंद, मावा कि मँगो. नेहमी स्टोरीया कोकोनट वॉटर पिणारा मी, आज त्यानेही माझा मूड ओळखला, एक गुलकंदाची मस्त गुलाबी रंगाची कुल्फी घेतली, बाहेर चिकटवलेला कोड स्कॅन केला, आतून पेटीएम पे प्राप्त हो गये असा स्पीकर मधून आवाज आला, त्याबरोबर तसाच बाहेरच्या बाहेर माघारी फिरलो. कुल्फीचा तो स्वाद, आणि तो थंडगार झुळझुळणाऱ्या हवेतील गारवा, असा तो इव्हनिंग वॉक, जीवनभर लक्षात राहण्यासारखा होता.


गजानन मुंडकर (पुणे )

Sunday 4 August 2019

खडग घेऊनि उभे ठाकले..


खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,
इनायतास फूस लावूनी,
स्वराज्याचे तोरण बांधले,
चाकण जिंकला नरसाळाने,
कोंढाणाही सयास आले,
बिजापूरी चाप लावूनि,
तीर्थरूपी धन्य पावले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,


रांझ्याचे चौरंग केले,
चंद्रावरि मोऱ्यास धाडले,
आई भवानी दुभंग पावली,
विठ्ठलासी कंप जाहला,
अफजलची आतडी मोजले,
अधामाशी अधम वागले
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,




ते तोफांचे बार झाले,
खिंडीत मग प्राण सोडले,
लग्न रयाबाचे सोडोनी,
सिंहगडासी गतप्राण झाले,
सह्याद्रीने असह्य केले,
बारा मावळे दुमदुमले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,


      मृत्यूच्या पालखीत हसत,
शिवा शिवबास धावूनी गेले,
महाराजांचे शब्द न पडती,
ते वेड्या हत्तीस झुंझले,
शिवबाचे ते रूप घेवूनि,
मृत्यू शयावरी स्थिर झोपले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,





                          कोंडाजीने आण भाकली,
साठांनी पन्हाळा जिंकले,
उदक सोडुनि प्राणावरती,
वीर मराठे रणकंदले,
शाहिस्तास शास्त केले,
औरंग्यासि मामा बनविले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,




कारतलब बोळीत गाठला,
सोयीने मुघल ठोकला,
सूरतही थरथर कापली,
बैल घेऊनी पून्हा लुटली,
बहलोलचे पानिपत केले,
सात मराठे वेडात दौडले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,
रणफंदी सह्याद्री मावळे,

-सेवेस ठाई तत्पर, निखिल अशोक चौंडकर 

Monday 13 August 2018

Think Zero


Text Box: Page1Brain/Mind in other words the Processor. Who Directs every Individuals to do , what to & what not to . Who only has ability to “Think” or “Store”.

How it works, simply it takes some input & gives a pre or determined result after processing just like a normal machine but with higher accuracy as well as higher garbage some time. But in other hand the man made machines never do a single mistake, if it did then also it is a human Error.
So why our brain gives garbage values some times? Why its own efficiency or you can say scan rate is less than a normal computer forget about Super one. Because the computer takes such amount of input what a user gives to it. In other hand our brain some time gives output with independent of Input.

Input for our body is the “Panchenderya “(Pancha-five, Indriya-sense). Who are the high accuracy and smarter Sensors; they are Chakshyu (Eye to see), Karna (Ear to listen), Ghrana (Nose to Smell), Rasana (Tongue to taste) and Twak (Skin to sense touch).
So what happens some time these sense organs gives input to the Brain, but at that instant brain is busy with some other work i.e. “Thinking” something which is irrelevant to these inputs. Let’s take an example, “you are driving, your eye watching the Road he saw that an object comes towards you, he gives this input to Brain but your brain is busy with some other work like something happened a while before , he judges the case which is not a case. And boom the accident happens.” If at that time the brain was free so he can work on that current input and can save himself.

So brain should always be free, so that its efficiency will increase. He can work on current inputs. Brain is useless without these sensing organs. There is no meaning of Brain if these fives are Non-Functional. Or we can say brain is just useless if it is not working on the Current Inputs to give a relevant output.

Again some time it requires giving high attention to particular or prioritizing these sensing organs or inputs, because these all are working at same time.to co-ordinate with all these inputs your brain need to be free so that he can arrange them priority wise. Sometime it happens he himself is not able to work on multiple inputs. Let’s take an example, you are listening to a speech in your television at that time it is highly essential to listen it, means to give priority to your ears rather than to watch or give priority to your eyes. If it, then you miss the speech. But sometime it requires working on both in Parallel. Like you are watching a movie, in this case you don’t want to miss a scene as well as the dialogues. But these two things happen simultaneously so your brain needs to take inputs of your eyes as well as ears.

Why I am saying brain should be free, because only brain having capability to process, to store. The input organs can give inputs but can’t process or store. If it misses these inputs then it misses a situation or you can say a chapter/lesion or a segment of knowledge. This may be really important to store/process.

Again to store we need space in our brain. The universe is treasure of knowledges. So there is no meaning of these knowledges if we don’t have space to store. Like there is enough wealth outside of

Text Box: Page2your house everyone is taking but you can’t though you don’t have space to store. So it is necessary to keep free space in your brain. Don’t make it full with unnecessary items.

So what we should do to make this free. It is simple, work on current inputs. It’s true that we can’t stop our brain directly to think something. But we can guide it. We have to say him, I saw this, I heard that.
Or simply feel that you are inhaling/exhaling, by practicing this more; brain will be more active for the current situations. So think “Zero”.



                                                                                                                     
Kanhu Charan Das

(Project Engineer, Qatar)

Saturday 12 May 2018

तहान


‘‘जलं ददाति जीवनम्’’

रखरखत्या उन्हामध्ये भर दुपारी कोरडा पाचोळा पायाखाली तुडवत एखादा उंच पर्वत चढावा आणि कित्येक तासाची ती पर्वत चढाई केल्यानंतर जीभ कोरडी करू पाहणारी ती तहान लागावी.
दूर डोंगरावर कुठेतरी कडीकपारीत एखादा थंड पाण्याचा झरा गर्द झाडीच्या सावलीत सापडावा. दगडावरून वाहणारा तो झुळ झुळ पाण्याचा आवाज कानी पडावा.
गारवा देणारी ती थंडगार हवा श्वासातून थेट हृदयात शिरावी आणि  घामेजून गेलेला त्वचेचा रोम रोम प्रफुल्लित व्हावा.

गर्द झाडीच्या त्या थंडगार सावलीत त्या इवल्याश्या झुळ झुळ वाहणाऱ्या झऱ्याजवळ गुडघे वाकून बसावे.
शांतपणे दोन ओंजळी पाणी चेहऱयावर घ्यावे आणि काही एक क्षण फक्त स्तब्ध राहून त्या चेहऱ्यावरील पाण्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्यावा. 
मग हळूच तिसरी ओंजळ पाण्याने भरून घ्यावी आणि डोळे बंद करून ती ओठाजवळ धरावी, श्वास घेताना जाणवणारा तो मातीमिश्रित गंध, पहिला श्वास छातीत भरून घ्यावा तो त्या थंडावा देणाऱ्या गंधाचा, ओठांनी त्या पाण्याला स्पर्श करावे आणि असे वाटावे कि जणू, जणू जीभेआधी ओठच पाणी पिऊ पाहत आहेत. बेचव आणि कोरड्या पडलेल्या जिभेवर तो पाण्याचा प्रवाह असा खेळावा, जणूकाही वाफाळण्याऱ्या जबड्यामधील आग क्षणात शांत व्हावी आणि चारीही बाजूंना थंडावा पसरावा.
जिभेवरून वाहत जाणारा तो थंडगार प्रवाह जेव्हा घशात उतरावा तेव्हा असे वाटावे कि जणू थेट शिवजीच्या जटामधून गंगेचा पहिलाच प्रवाह पृथ्वीवर यावा नि स्मशानातील तो कैक युगापासून धगधगणारा विस्तव त्याने कायमचा विझवून टाकावा.

हेच ते पाणी, हेच ते अमृत, हेच ते जीवन.
जगातील सर्वात जुन्या विकसित संस्कृती, इजिप्तशियन संस्कृती (इ स पूर्व ३००० -५५०) आणि सिंधू संस्कृती (इ स पूर्व २५०० -१५००), दोन्ही संस्कृती मोठ्या नद्या काठीच विकसित झाल्या, जिथे वातावरणाचा संगम हा तंतोतंत जुळणारा होता म्हणजेच स्वच्छ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा.

घनदाट जंगले, वर्षावने आणि कित्येक नद्या असलेला तसेच मनुष्य प्रजातीचे उगमस्थान म्हणून प्रचलित असलेला आफ्रिका तितका प्रगत झाला नाही, पण त्याच आफ्रिकेतून वाहणारी नाईल नदी जेव्हा उजाड वाळवंटात प्रवेश करते आणि शेकडो मिल यानंतर वाहत जाते तेव्हा -
एक प्रगत अशी इजिप्तशियन संस्कृती पाहावयास मिळते, इजिप्तचे पिरॅमिड हे अद्भुत वास्तूचा कलाकारी नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहेतच.
म्हणतात ना एखाद्याला त्याचीच कदर असते जे त्याला अतिशय कठीण परिश्रमानंतर मिळते, नद्यांचे महत्व हे पटवणे तसे कठीणच पण आभार मानावे गुगल मॅप चे ज्यावर नाईल नदी घरबसल्या पाहावयास मिळते आणि पाहावयास मिळतो तो अभूतपूर्व चमत्कार. 

भर वाळवंटात तो शेकडो किलोमीटर रुंद पसरलेला हिरवागार पट्टा आणि तिथे आनंदाने फुलणारे ते जीवन.
खरेच किती अद्भुत ते दृश्य, गुगल मॅप वर दिसणारी ती नदी सरासरी 2 ते 4 किलोमीटर रुंद असेल पण आजूबाजूचा शेकडो किलोमीटरचा परिसर तिने हिरवागार करून सोडला आहे . आणि तिथेच पाण्याचे पूर्ण महत्व समजणारी अतिशय प्रगत इजिप्तशियन संस्कृती उदयास आली.
कदाचित हेच गमक भारताबाबत हि असेल, सर्वात मोठी नदी गंगा पण वाळवंटातून वाहिली ती सिंधू म्हणूनच सिंधू संस्कृती उदयास आली.

भरत राजाचे आर्य वंशज भारतीय गणले जाऊ लागले आणि भरत राजाचे राज्य हे भारत वर्षे म्हणून प्रसिद्ध झाले जे कि सिंधू प्रांतांसहित सर्वदूर पसरलेले होते. भाव, राग आणि ताल म्हणजेच भारत मध्ये रुची ठेवणारी आणि त्यात निष्णात असणारी अशी हि अतिशय प्रगत भारतीय संस्कृती ह्या सिंधू खोऱ्यामध्ये तर विकसित झाली.
सिंधू संस्कृती हि सिंधू नदीच्या काठी विकसित झाली आणि पाण्याच्या शोधात आलेल्या फारशी लोकांनी फारशी भाषेत “सिंधू” (هندو) असे लिहले मात्र फारशी शब्दात आणि उच्चारात तिचा उच्चार हा “सिंहदू” असा निघाला आणि कालांतराने स निघून तो “हिंदू” असा झाला,
मग सिंधू प्रांत हा हिंदूस्थान असा भाष्यांतरित झाला. उदार मनाच्या सिंधू प्रदेशातील विकसित भारतीय लोकांनी हिंदूस्थान हे हि नाव गौरवपूर्वक स्वीकारले. 
कालांतराने व्यापारानिमित्त आलेल्या ग्रीक लोकांनी हिंदू नदीला त्यांच्या उच्चारात इंदू नदी म्हणजेच इंदूस असे संबोधले कालांतराने त्यांच्या अक्षरात इंदूस रिव्हर हि इंडस रिव्हर झाली आणि हिंदुस्थान हा “ινδουάν” (indouán) इंदूयान तर स्पॅनिश भाषेत (indua) “इन्दूयां” कालांतराने इंग्रजीत तो इंडिया (India) असा झाला. इंग्रजांच्या जगभर वसाहती पसरलेल्या असल्यामुळे पुढे सिंधप्रांत हा इंडिया म्हणून प्रचलित झाला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी कि "इंडिया" "हिंदुस्थान" अशी वेगवेगळी नावे ज्या प्रांताला मिळाली ती फक्त त्याच्याकडे असलेल्या भरगोस पाण्यामुळे, थोडक्यात सिंधू नदीच्या वैभवामुळे, शेकडो वर्षांपूर्वी इंडिया व हिंदुस्तानची ओळख हि फक्त आणि फक्त पाण्याचा मुबलक साठा हि होती, "सोने कि चिडिया" च्या कित्येक शेकडो वर्ष आधी "पाणी का धन" म्हणून भारत प्रसिद्ध होता.


लाजिलवानी गोष्ट अशी कि, आज घडीला पाणी टंचाई, दूषित पाणी, दुष्काळ असे हाल सर्वात जास्त इथेच पाहायला मिळतात.
बाराबलुतेदारांमध्ये सर्वात समृद्ध असणारा आणि सर्व देशाला पोसणारा बळीराजा आज सरकारी विमा आणि अनुदान मागून जगतो आहे. एकेकाळचा सर्वात समृद्ध असा बलुतेदार आज, पाऊस नाही म्हणून रडतो आहे.
शहरी भागातील पांढापेशी लोकांना तर पाण्याचे महत्व समजावणे अतिशय कठीणच.
पाणी आणि त्याचा वापर हा काही दररोज 500 लिटर ची टाकी आणि फ्रिज मध्ये बाटली भरून ठेवण्याइतका एवढाच मर्यादित नसतो .
शहरी भागात वाढलेल्या पांढरपेशी मनाला इतकेच ते पाणी समजते आणि ते नाही भेटले कि जाणवते ती पाणी टंचाई.
जमिनीत मुरलेले पाणी हे अजब जादूगिरी करीत असते, हिरव्यागार गवताची ती चादर आणि आणि शेकडो जीव जंतूंना अभयदान ते देते आणि तोच निसर्ग हा नैसर्गिक असतो आणि त्या खुल्या मोकळ्या पोषक खेळीमेळीच्या वातावरणात उपजलेले अन्नधान्य हेच खरे पौष्टिक असते, जे शरीलालच नव्हे तर आत्म्याला पण थंडावा देते. 
कदाचित विज्ञानाचा शोध शेकडो वर्षांपूर्वी लागला नसता तर वाळवंटातून वाहणारी ती नाईल नदी कदाचित घरबसल्या पाहता आली नसती, गृह ताऱ्यांचे रहस्य कधी समजलेच नसते (जे आताही समजणे कठीणच), जग फिरता आले नसते, विविध कल्पनांनी बहरलेले चित्रपट पाहता आले नसते, कदाचित ज्याच्यात जीव अडकला आहे ते वायफाय आणि इंटरनेट वापरताच आले नसते, पण का को जाणे कदाचित ह्या सर्वांची गरजही पडली नसती, कुठेतरी एखाद्या घनदाट जंगलात नदी काठी एखाद्या गलेलठ्ठ झाडाच्या फांदीवर बसून मी आरामात आंबे नि द्राक्षे खात असलो असतो…. असो .
तहानलेल्याला पाणी पाजवण्याचे पुण्य आणि यासारखे श्रेष्ठ दान हे कोणतेच नाही.
अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने पळू पाहणाऱ्या ह्या स्पर्धात्मक जगाला मी आजपर्यंत मांजरीच्या डोळ्याने बघत आलो, व्हाट्सअँप वर फक्त काळी टिक्स निळी करीत राहिलो. बाकी माझ्या विश्वापलीकडे कधी काही लिहले नाही.
आज लिहावेसे वाटते, आणि आज बोलावेसे हि वाटते,
सत्यमेव जयतेने राबवलेल्या पाणी फौंडेशन स्पर्धेनिमित्त …
भेगांच्या रूपात तुकडे होऊन विरक्त होऊ पाहणाऱ्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर, पाण्याच्या ओलाव्याने माती नि नाती घट्ट करू पाहणाऱ्या ह्या पाणी फौंडेशनचा मी अत्यंत अगदी हृदयापासून समर्थन करतो.
कुठल्याही सामाजिक कार्यापेक्षा मनुष्याकडून दिलेली निसर्गाला निव्वळ भेट म्हणजे हि पाणी फौंडेशन स्पर्धा होय, आजतागायत करोडो रुपये ना ना योजनेत सरकारने आणि कित्येय स्वयंसेवी संस्थेने खर्च केले असतील पण मनुष्याने मनुष्यासाठीच नव्हे तर निसर्गासाठी दिलेली निव्वळ भेट म्हणजे हि पाणी फौंडेशन यौजना होय.

सिव्हिल इंजियनीयरिंगचे किचकट गणिते आणि पाणलोटाच्या पद्धती अत्यंत सध्या भाषेत सांगणारे ते चतुरराव आणि चतुराताई हि कल्पनाच मुळी भन्नाट वाटली. कुठल्याहि पूर्व कौशल्यविना, अगदी १०-१५ मिनिटाचा व्हिडीओ पाहून हैड्रोमार्कर ते कंटूर रेषा आखण्याचा पद्धती अगदी शाळेतील मुलाला सुद्धा समजेल एवढी ती सोपी पद्धत.
गॅबियन पासूनते अगदी वॉटरशेड पर्यंत पाणी संवर्धनाच्या विविध पद्धती रीतसर रित्या मांडल्या गेल्या आहेत. अशा कल्पकतेला दुजोरा नि मदत करणारे जीव हे नक्कीच अगदी शांत मानाने त्यांचा देह त्यागतील, भलेही सांसारिक जीवनात ते कितीही ओरबाडले गेले असू पण काही वर्षात दूरवर पसरलेली हिरवळ पाहून नक्कीच त्यांचा आत्मा समाधानी होईल.
हेच तर निव्वळ गणित आहे जीवनचक्राचे, निसर्ग संवर्धनासाठी केलेले श्रमदान भलेही ते व्यक्तिगत स्वार्थासाठी केलेले असू पण ते नकळत नक्कीच समाधानी बनवेल, चिडचिडेपणा आणि नकारात्मक विचारांना दूर सारेल, अहंकार क्रूरता आणि युद्ध यासारख्या भावनांना पुसून टाकेल, आणि मग अनेक दशकानंतर जे काही उगवेल ती असेल एक अतुलनीय, शांत, सभ्य, समृद्ध आणि अतिशय विकसित संस्कृती.
संवर्धनासाठी झटणाऱ्या अशा सर्व देवदूतांना माझा मनाचा मुजरा …



गजानन व्यंकटराव मुंडकर 
(बी इ इलेक्ट्रिकल)
(लातूर)